Posts

Showing posts from 2018

हरवलेल्या बॅगेला धन्यवाद

हरवलेल्या बॅगेला धन्यवाद                           चि. स्वप्नील व दीपश्री दोघेही १२ डिसेंबर २०१८ ला स्वीडनला जाण्यासाठी मुंबईहून सकाळी दहा वाजता विमानाने निघालेत नि कार्गोमध्ये चार बॅग्ज टाकून दोन बॅग्ज त्यांनी स्वतःजवळ ठेवल्यात. रात्री साडेबाराला (भारतीय वेळेनुसार) स्टॊकहोमला पोहचले असता कार्गोने आलेल्या चार बॅगांपैकी फक्त तीनच बॅग्ज मिळाल्यात नि एक बॅग काही मिळाली नाही तेव्हा त्यांनी एअरपोर्टवर नियमानुसार एक बॅग न मिळाल्याची नोंद केली नि फार्म भरून कार्यवाही पूर्ण केली.                स्वप्नील यापूर्वी दोनदा स्वीडनला जाऊन आल्यामुळे त्याला स्वीडनच्या वातावरणाची तशी सवय झालेली होती पण दीपश्री (सून) प्रथमच स्वीडनला जात असल्यामुळे तिच्यासाठी सर्वकाही नवीनच होते. त्यात बॅग हरवल्याची खंत होतीच. रात्री तिच्याशी बोलताना तिला सांगितले, "बॅग हरवल्याचे दुःख वाटून घेऊ नकोस, तुम्ही एवढ्या लांब सुखरूप पोहोचलात याचाच आनंद खूप आहे. बॅग सापडली तर ठीक आहे, नाहीच मिळाली तर वस्तू गेल...

व्हॉटसअपवरील गंमतीजमती

व्हॉटसअपवरील गंमतीजमती                               ब्लॉगवरील 'माझी सवत भेंडी' हा लेख वाचून माझा वर्गमित्र अविनाश याने व्हॉटसअप ग्रुपवर एक पोस्ट टाकली 'मला ज्योत्स्ना ताईचे एक गुपित कळले आहे की,ज्योत्स्ना ताईला एक सवत आहे, हे वाचून मला खूप वाईट वाटले आहे आणि ज्योत्स्ना ताई कुणाकडे जेवायला आली तर भेंडीची भाजी अवश्य करावी कारण ज्योत्स्ना ताईला भेंडी खूप आवडते.' अविनाशच्या या पोस्टने सगळेच बालमित्र विचारात पडलेत नि दिवसभर कुणीच पोस्ट टाकायला धजावले नाही. अविनाशने सांगितले 'सवती' शब्दाची बघितली किती दहशत आहे! कुणीच पोस्टला रिप्लाय द्यायला तयार नाही.काही मित्रांनी अविनाशला फोन करून विचारले तर काही मित्र चक्क त्याला भेटलेच. जनाबाई या बालमैत्रिणीने तर संध्याकाळी न राहवून विचारलेच, 'हे काय आहे अवि!' त्यावर अविने तिला मोठ्या गंमतीने रिप्लाय दिला, 'खूपच दुर्दैवी घटना, किमान तुला तरी वाईट/आश्चर्य वाटले.' जनाबाईच्या पोस्टनंतर थोडेसे धाडस दाखवत अनिल साळुंकेने पोस्ट टाकली, 'अवि दादा हे काय? ज्योत्स्ना माई...

कुटुंबातील रँगिंग

 कुटुंबातील रँगिंग                                    अनेक कुटुंबात नव्या नवरीचे कौतुक वगैरे करण्याची फारशी पद्धत दिसत नाही. नवी नवरी घरात आली आणि कांकण सुटले की तिने कामाला लागले पाहिजे असा दंडक असतो. अठ्ठावीस वर्षांपूर्वी अशाच एका नवरीला  कांकण सुटताच कामाला लागावे लागले. कांकण सुटताच नव्या नवरीला फर्मान सोडण्यात आले वांग्याची भाजी करण्याचे. सासूबाईंनी नव्या नवरीकडे दीडएक किलो वांगी सुपूर्द केलीत. माहेरी आईकडे असताना वांगी म्हणताच तिच्या तोंडाला पाणी सुटायचे आणि सासरी मात्र सासूबाईने वांगी तिच्या हाती देताच तिच्या तोंडचे पाणीच पळाले शिवाय त्या वांग्यांच्या काटयांचे अक्राळविक्राळ रूप पाहून तर चांगलीच बावरली बिच्चारी ... आता मात्र आलिया भोगासी .... याशिवाय पर्यायच नव्हता.               नाटयाभिनय करून इतिहास शिकविणाऱ्या बाईंचे शिकविणे तिने जितक्या तन्मयतेने अनुभवले तितक्याच तन्मयतेने तिने वांगी कापण्यास सुरूवात केली परंतु काही नाठाळ...

पातोड्यांची आमटी - गोव्यात

    पातोड्यांची आमटी - गोव्यात                   मी मुलांना घेऊन गोव्याला पाटील साहेबांकडे गेले होते. आता गोव्याला पंधरा दिवस चंपाबाईच्या हातचे जेवण मिळणार म्हणून मी खूश होते. पंधरा दिवस स्वयंपाक घराशी मला काहीही देणेघेणे नाही,असा मी मनाशी ठाम निश्चय केला होता. परंतु सर्वच निश्चय पूर्णत्वास जातीलच असे सांगता येत नाही. माझा हा निश्चय दोन दिवसातच डळमळीत होण्याच्या मार्गावर दिसू लागला. मी गेल्यापासूनच भुपेशने(आमच्या कंपनीतील भागीदार रमेशभाई यांचा चिरंजीव) चांगलीच भुणभुण सुरू केली, "भाभीजी, तुम्ही आहेत तोपर्यंत चंपाबाईला रजेवर पाठवून देऊ." त्याच्या त्या वक्तव्यावर मी म्हणाले, "मी गोवा पाहण्यासाठी आले आहे. तुमची सर्वांची स्वयंपाकीण (कूक) म्हणून आलेली नाही." माझ्या उत्तरावर भुपेशकुमार अगदी अजीजीच्या स्वरात म्हणायचा, "भाभीजी, चंपाबाईच्या हातचं खाऊन इतका कंटाळा आला की, आता तिला आम्ही कायमची रजा देऊन टाकतो आणि नवीन गोवियन लडकीच शोधतो नि दिलिप भाऊला गोवेकर बनवून टाकतो." त्याच्या त्या वक्तव्यावर मीही ठासून म्हणाले, " दिलिप भाऊब...

निरीक्षण

 निरीक्षण        ​ भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी  १० नोव्हेंबर २०१८ ला  आमचे दोंडाईच्याचे व्याही आणि विहिणबाई लेकीला  (आमच्या सूनबाईला)  घ्यायला आले असता आमचे पाटील साहेब मला म्हणाले, "सकाळपासून कुणी ना कुणी पाहुणे येऊन राहिले आहेत तर आज आपण सर्वजण जेवायला हॉटेलमध्येच जाऊ या." आम्हीही खूपच दमलो होतो त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही लागलीच, 'हो'  म्हणालो.          ​ ​  शाकाहारी व मांसाहारी जेवण करायचे असल्यामुळे आम्ही 'हॉटेल याहू' ला गेलोत तेव्हा दुपारचे अडीच वाजायला आले होते. आम्ही पाचजण हॉटेलमध्ये पोहचलो नि माझा मुलगा व व्याही,विहिणबाई आमच्या नंतर आले असता. सगळ्यांनी पटापट ऑर्डर दिली कारण व्याह्यांना दोंडाईच्याला पोहचायला उशीर होईल म्हणून आम्ही पटकन जेवणाची ऑर्डर देऊन जेवण आटोपले नि वेटरने फिंगर बाऊल आणले आणि माझ्या सासूबाईंनी फिंगर बाऊलमध्ये हात बुडवला नि तितक्यात मी टेबलवरील टिश्यू पेपर काढून माझ्या सासूबाईंच्या हातात दिला आणि त्यानंतर मीही फिंगर बाऊलमध्ये हात धुऊन पर्समधला हातरुमाल काढून माझा ओ...

धन्यवाद रसिक हो!

धन्यवाद रसिक हो! सर्व साहित्य रसिक वाचकांना ज्योत्स्नाचा, सप्रेम नमस्कार.  तुम्ही सर्वांनी माझ्या ब्लॉगला भेट देऊन मला फोनद्वारे, व्हाटसएपद्वारे, व ब्लॉगवर कमेंट्स पाठवून भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुम्हां सर्वांची खूप खूप आभारी आहे.       

आपल्या पाल्याची आवड जाणून घ्या

 आपल्या पाल्याची आवड जाणून घ्या                                    इयत्ता दहावीच्या परीक्षा जवळ येत आहेत आणि गणित, विज्ञान व इंग्रजी याच विषयांना महत्त्व देणाऱ्या पालकांना मराठी, हिंदी व समाजशास्त्र या विषयांचे महत्त्वच कळले नाही त्यामुळे भविष्यात समाजाला याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे कारण मातृभाषेचा अभ्यास योग्यप्रकारे केला तरच मुलांवर सुसंस्कार होतात, नैतिक मूल्ये ही मातृभाषेतूनच रूजत असतात. तसेच समाजशास्राचा अभ्यास चांगल्याप्रकारे केला तरच मुले चांगले नागरिक बनून देशासाठी योग्य काम करतील. आज डॉक्टर, इंजिनियर यांचे प्रमाण मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे त्यात यशस्वी करियर करणे म्हणजे खूपच कठीण झाले आहे. आज अनेक नवनवीन क्षेत्र मुलांसाठी उपलब्ध झाली आहेत त्यामुळे आपल्या मुलाचा कल, आवड ओळखून शिक्षण किंवा कौशल्य शिकविण्यातच शहाणपण आहे. आज वेळ व पैसा दोन्ही गोष्टी बहुमूल्य आहेत त्यामुळे लाखो रुपये क्लासेसची फी भरून मुलांना न आवडणाऱ्या क्षेत्रात टाकून वेळेचा व पैशांचा...

मिनी टिफिन

Image
     मिनी टिफिन                           प्रवासात वेळोवेळी अनेक हॉटेल्सला भेट दयावीच लागत असते आणि काही हॉटेल्स कायमच्या  स्मरणात राहतात  त्या एकतर चांगले जेवण मिळाले म्हणून किंवा सर्वात निकृष्ट , बेचव जेवण मिळाले म्हणून किंवा मेनूच्या गुणवत्तेपेक्षा अधिक दर आकारल्यामुळे किंवा हॉटेलच्या उत्कृष्ट वातावरण निर्मितीमुळे किंवा हॉटेलमधील वेटर , मँनेजर यांच्या सौजन्यपूर्ण व्यवहारामुळे .                 असेच एक हॉटेल आमच्या सर्वांच्या कायमचे लक्षात राहील कारण हे हॉटेल आम्ही कधीच विसरू शकत नाही ते त्याच्या खास अशा खासियतमुळे .  १ नोव्हेंबर २०१४ ला आम्ही तीन कुटुंबिय कन्याकुमारीहून मदुराईला जाण्यास निघालो असता तिरुनेलवेली ( tirunelveli ) महामार्गाला लागलो असता रस्त्यात एक हॉटेल दिसताच आम्ही नाश्त्यासाठी गाडया थांबवल्यात . हॉटेल चांगले दिसत असल्यामुळे सर्वांनी नाश्ता करून पुढे जाण्याचे ठरवले .          ...
Image
आदर्श राजकीय व्यक्तिमत्त्व -    श्रीनिवास पाटील सर                          डिसेंबर २०१७ ला आमच्या साहेबांनी सिक्कीम ट्रीपचे बुकिंग केले आणि दोन गोष्टी डोळ्यांसमोर आल्यात त्या म्हणजे सिक्कीमचा निसर्ग आणि महाराष्ट्राला भूषण वाटावे असे व्यक्तिमत्त्व सिक्कीमच्या प्रगतीला हातभार लावीत आहे, अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला भेटण्याची मनापासून इच्छा निर्माण झाली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून माननीय श्रीनिवास पाटील सरांची नेमणूक केली तेव्हाच एक कुतूहल निर्माण झाले होते पण श्रीनिवास पाटील सरांना भेटण्याचा योग येईल असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते परंतु सिक्कीम ट्रीपचे बुकींग झाल्याबरोबर मनात आशा निर्माण झाली नि काहीही झाले तरी आपण सिक्कीमला गेल्यावर दादासाहेबांची (माननीय श्रीनिवास पाटील) भेट घ्यायचीच. दोन महिन्यात अनेकवेळा मनात विचार येऊन गेला की, आपण सिक्कीमला गेल्यावर नेमके दादासाहेब (माननीय श्रीनिवास पाटील) कुठे दौऱ्यावर गेलेत तर आपली भेट होणार नाही किंवा टूरच्या नियोजनानुसार आपल्य...
Image
धर्मनिरपेक्ष देश            २४ डिसेंबर २०१७ ला बागडोग्रा विमानतळावर पोहोचलो आणि तेथे आमच्या दिमतीला संतोष अर्धलकर व कॅल्टन  परेरा हे दोघे हजर. दोघांनी आमचे स्वागत केले आणि संतोषने त्यांचा दोघांचा परिचय देताच त्याचे आडनाव ऐकून सगळ्यांनी, "काय म्हणालास ?"त्यालाही त्याच्या आडनावाचा अनुभव गाठीशी होताच त्यामुळे त्याने सर्वांना पुन्हा एकदा स्लो स्पीचमध्ये आडनावाचा सगळ्यांना समजेल असा उच्चार केला नि सगळे एका तालासुरात म्हणाले , " संतोषच ठीक आहे." अशाप्रकारे संतोषच्या नावाचा अर्धविराम वगैरे होऊ नये म्हणून सगळ्यांनी संतोषमध्येच संतोष मानून घेतला आणि संतोषने त्याच्या साथीदाराचे नाव कॅल्टन  परेरा असे उच्चारताच सगळ्यांना कॅल्टन  ऐवजी परेराच ठीक वाटले. या दोघा टूर मँनेजरच्या नावात एकाचे नाव आवडले तर दुसऱ्याचे आडनाव. काय गंमत आहे ना नावांची! सगळ्यांच्या नावांची बाराखडी वाचून झाल्यावर आम्ही बागडोग्राला एका हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला नि गंगटोकला जाण्यासाठी किती वेळ लागेल व एका गाडीत किती पर्यटकांनी बसायचे अशी सविस्तर माहिती दिली. सिक्कीममध्ये प्रव...
तिची नि माझी भाषा                          फेब्रुवारी महिना येताच कुसुमाग्रजांची जशी आठवण येते त्याचप्रमाणे तिरुअनंतपूरमला भेटलेल्या एका महिलेचीही हमखास आठवण येत असते . २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करताना मला तिची नेहमीच आठवण येते आणि भाषा म्हणजे काय ? याचे उत्तर खऱ्या अर्थाने मिळत असते . १२ नोव्हेंबर २००५ ला मी व माझी नणंद तिरुअनंतपूरमला एका रेस्टारंटमध्ये जेवण करीत असताना आमच्या गप्पा चालू होत्या . गप्पा करीत जेवणाचा आस्वाद घेत असतानाच एक स्री आमच्याजवळ आली आणि मला म्हणाली , "एक्सक्यूज मी , तुम्ही महाराष्ट्रीयन का ?" मी हो म्हणताच ,तिने लागलीच दुसरा प्रश्न विचारला , "कुठून आलात ?" आम्ही आमची सविस्तर माहिती सांगितली तेव्हा ती स्री म्हणाली ,"मराठी शब्द कानावर पडले की खूप छान वाटते . मला मराठी बोलणारे भेटताच माझे बालपण परत मिळाल्यासारखे वाटत असते . " तिच्या त्या भावना जाणून मी तिला बोलते केले . तुम्ही तर तेलगू बोलतात मग तुम्हांला मराठी कसे बोलता येते ? माझ्या या प्रश्नावर त्या स्रीने माझ्यासम...
जशी दृष्टी तशी सृष्टी                        मी एका नामांकित क्लासेसमध्ये मराठी ,हिंदी व समाजाशास्र विषय शिकवीत असे .एके दिवशी मी विदयार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीविषयी माहिती सांगत असताना एका विद्यार्थ्याचे पालक आले असता त्यांनी त्यांच्या पाल्याला काही कामासाठी बाहेर जाण्याची परवानगी मागितली .मी त्या विद्यार्थ्याला बाहेर जाण्याची परवानगी देताच त्याने त्याची चप्पल शेल्फ्वरून काढून पायात घालताच शेवटच्या बाकावरचा एक विदयार्थी हळू आवाजात त्याला म्हणाला , "तुझी चप्पल तर फारच सेक्सी आहे ." बाहेर जाणारा विदयार्थी त्या विद्यार्थ्याकडे रागाने पाहत ,"बाहेर ये मग बघतो तुझा बेत ." असे हळू आवाजात पुटपुटत बाहेर पडला .त्या दोघांनाही वाटले की माझे त्यांच्याकडे लक्षच नाही .मी चपलेला नाव ठेवणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गात उभे केले आणि सांगितले ,"तू आत्ता जे वाक्य बोललास ते वाक्य सर्वांसमोर बोल ." चप्पलला सेक्सी म्हणणारा विदयार्थी खजिल झाला आणि खाली मान घालून उभा राहिला .मी वर्गातील सर्व विदयार्थ्यांना उद्देशून सांगितले," जे वा...

शिऱ्याची गोडी

शिऱ्याची गोडी                   दर पंधरा दिवसांनी लोणी काढताना दोन गोष्टी हमखास आठवतात, त्या म्हणजे शेवाळी (दातर्ती , जि. धुळे )येथील आजोबांचे ( मामाचे ) गाव आणि संत तुकारामांच्या अभंगातील ओवी. संत तुकाराम महाराज म्हणतात, मृदु सबाह्य नवनीत (लोणी ) तैंसे सज्जनाचे चित्त दैनंदिन व्यवहारातील साध्या, सोप्या उदाहरणांनी जीवनाचे मर्म उलगडून दाखविणाऱ्या संत तुकारामांच्या प्रतिभेला खरे तर तोड नाही. असं हे आतून बाहेरून मृदु असणारे लोणी जेव्हा माझी मामी भांडयात काढायची तेव्हा ते भांडयात पडण्यापूर्वीच माझ्या तोंडात गडप व्हायचे. मामी ताक घुसळेपर्यंत व लोणी काढेपर्यंत पाव किलो लोणी तरी माझ्या पोटात गडप व्हायचे. मामी ताक घुसळेपर्यंत व लोणी काढेपर्यंत पाव किलो लोणी तरी माझ्या पोटात ठाण मांडून बसायचे. पोटात गेलेल्या या पांढऱ्या लोण्याचे रक्तात रूपांतर कसे होते? हा बालपणी पडलेला प्रश्न दरवेळी लोणी काढताना आठवतो आणि नकळत ओठांवर हसू उमटते. मामीने काढलेल्या लोण्यापासून दीड ते दोन किलो तूप तयार व्हायचे. तूप झाल्याबरोबर ...
पाण्याचे महत्त्व उशीरा कळले                           तीस पस्तीस वर्षापूर्वी आम्हां भावंडाकडून पाण्याचा नळ किंवा विजेचा दिवा कारण नसताना चालू राहून गेलाच तर माझे वडील म्हणायचे," पाणी आणि वीज काही तुमच्या बापाची नाही आहे .ती राष्ट्राची संपत्ती आहे ." दुसरं कुणी असं बोललं असतं तर त्याला चौदावं रत्न दाखवलं असतं पण आमचे वडीलच 'आमचे बाप' काढायचे तेव्हा फिर्याद तरी कुणाकडे करणार?आमचे वडील पाण्याला आणि विजेला राष्ट्राची संपत्ती का म्हणतात ? तेच कळत नसे . नदीत तर पाहिजे तेवढे पाणी वाहून जाते तर मग नळाचे थोडेसे पाणी वाहून गेले तर आपले वडील एवढे चिडतात का ?असा प्रश्न आम्हां भावंडाना पडत असे .तीच गोष्ट विजेच्या बाबतीत .आणि राष्ट्रीय संपत्ती म्हणजे काय ? हा आणखी गोंधळात टाकणारा विषय .अर्थात कॉलेजला गेल्यावर सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळालीत .आम्हांला ज्या प्रश्नांची उत्तरे कॉलेजला गेल्यावर मिळालीत त्याच प्रश्नांनी आज किती गंभीर स्वरूप धारण केले आहे याची जाणीव होऊन वडिलांची पर्यावरण संरक्षणाची तीस पस्तीस वर्षापूर्वीची तळमळ लक...
गरज पर्यावरण संस्कारांची                            एके दिवशी मी माझ्या मुलाला फोन केला असता तो उत्साहाने म्हणाला , " आई , आज मी एक पर्यावरणाचं रोपटं लावलं . " त्याचं पर्यावरणाचं रोपटं काही मला उलगडेना तेव्हा त्याने जे सांगितले ते ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून आला . २००७ मध्ये माझ्या मुलाने चि . स्वप्नीलने पुण्याला सिंहगड कॉलेजमध्ये पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला . कॉलेजच्याच होस्टेलमध्येच राहण्याची व्यवस्था होती . होस्टेलमधील त्याचे रुममेट हे गुजरातमधून आलेले होते . माझा मुलगा रूमबाहेर पडताना प्रत्येकवेळेस रूममधील पंखा व दिवा बंद करूनच बाहेर पडायचा तर याउलट त्याचे तिघे सहकारी पंखा व दिवे बंद न करताच बाहेर पडायचे . एके दिवशी माझा मुलगा व त्याचे तिघे सहकारी एकाचवेळी रूमबाहेर पडलेत आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्या मुलाने पंखा व दिव्याचे बटन बंद केले असता त्याचे सहकारी त्याला म्हणाले , " पंखा व दिवा चालूच राहू दे, बंद करू नकोस, आपल्याला चाळीस हजार रुपये भरूनही गरम पाणी मिळत नाही, चांगले जेवण म...
रसिक वाचकहो, सप्रेम नमस्कार. ​माझी ब्लॉगवरील ही पोस्ट माझ्याकडूनच डिलीट झाली त्यामुळे ही पोस्ट पुन्हा पब्लिश करीत आहे. ​ ​खूप वर्षांपासून ब्लॉगवर लिहिण्याचे ठरवूनही योग येत नव्हता नि शेवटी काल म्हणजेच १६ नोव्हेंबर २०१८ ला मी ब्लॉगवर पहिला लेख लिहिला तो आमच्या घरचा दिवाळीचा सण याविषयी. तसेच मी माझ्या ब्लॉगला 'माझी भटकंती' असे नाव दिले कारण की भटकंती ही फक्त प्रवासापुरतीच सिमित नसून ती सर्वच क्षेत्रात असणारी भटकंती होय. कधी माझी लेखणी भावभावनांची भटकंती घडवेल तर कधी खाद्ययात्रेत असेल तर कधी नात्यागोत्यात भटकेल तर कधी देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडींवर स्वार होईल तर कधी काव्य प्रांतात भटकेल तर कधी ललितच्या (साहित्यातला ललित हं, नाहीतर तुम्हांला दुसराच ललित वाटायचा) वाटेला जाईल तर कधी कथेत विहार करेल तर कधी नाटकातही विहरणार अशी सर्वत्र विहार करणारी मी व माझी लेखणी ब्लॉगवर फेरफटका मारणार तेव्हा तुम्ही रसिक वाचकांनी माझा रस्ता चुकल्यावर योग्य रस्ता दाखवण्याचे काम मात्र जरूर करावे तरच हा लेखन प्रवास सुखकर होईल नि इप्सित साध्य होऊन भटकंतीचा आनंद सर्वांनाच मिळेल. धन्यवाद. ...
स्पर्धा घेण्यामागचा उद्देश                                स्रियांची मासिक पाळी या विषयावर स्पर्धा घेण्यामागे माझा मुख्य उद्देश होता की, स्रियांना वर्षानुवर्षे ज्या गोष्टी मनात जाचत असतात त्या गोष्टीतून मोकळे करणे आणि पुरुषांनी या गोष्टीकडे निर्मळ मनाने पाहणे. मासिक पाळीचा पहिला अनुभव बऱ्याच स्रियांचा व मुलींचा हा कष्टप्रदच नव्हे तर मानसिक संतुलन बिघडवणारा देखील असतो. एका मुलीने तर शाळेत पाळी आल्यामुळे मुलांनी चिडवले होते म्हणून शाळाच सोडून दिली होती. एकीने तर आईकडे गर्भपिशवी काढून टाकण्याचाच हट्ट धरला अशा अनेक गोष्टी समाजात घडत असतात पण त्याविषयी समाज अनभिज्ञ असतो तेव्हा समाजाला अशा नाजूक विषयावर सजग करणे हाच खरा या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश होय. बारा-तेरा वर्षाची मुलगी अल्लडपणे खेळत असते, बागडत असते आणि एके दिवशी तिला पाळी आली की, अचानक मोठे केले जाते नि सांगितले जाते."तू आता मुलगी नाही तर स्त्री आहेस." हे ऐकल्यावर तिची होणारी तारांबळ आणि त्यातच पाळीमुळे होणारा शारीरिक त्रास...
'वेडावूनी गेले वय'                             तिचे दहावीचे प्रथम सत्र संपले होते. प्रथम सत्राची परीक्षा नुकतीच संपली होती म्हणून ती आनंदात होती. सगळीकडे दिवाळीच्या कामांची लगबग चालली होती. कुणी घराला रंग देण्याचे काम करीत होते तर कुणी अंगण ठाकठीक करण्यात दंग. घरातील बायका फराळासाठी गहू दळून रवा, मैदा काढण्याच्या कामात गर्क होत्या. प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळीच्या तयारीला लागले होते. त्यात तीही रांगोळी काढणे, रांगोळीत रंग भरणे यासारखी कामे करीत सुटीचा व दिवाळीचा आनंद ऊपभोगत होती. ऊदया दिवाळी म्हणून ती खूप आनंदात होती आणि अचानक तिच्या पोटात व पायात वेदना होऊ लागल्यात परंतु दिवाळीच्या आनंदापुढे तिने शरीराला होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले. संध्याकाळी ती अंगणात रांगोळी काढत असतानाच काहीतरी झाले असे वाटून ती बाथरुममध्ये गेली आणि स्वतःचे कपडे नीट न्याहाळून पाहिले असता तिला तिचे अंतर्वस्र रक्ताने लाल झालेले दिसले. ती तशीच बाहेर आली आणि ओटयावर बसून रडू लागली. तिला रडताना पाहून आजी तिच्याजवळ आली आणि तिला म्हणाल...
अनुभव पहिला                                                         ('मासिक पाळीचा पहिला अनुभव' या स्पर्धेतील पहिला लेख) ती नऊ दहा वर्षाची असताना खेळता खेळता पडली . तिच्या गुडघ्याला मोठी जखम झाली आणि संपूर्ण पाय रक्ताने लाल झाला . रडत रडत ती घरी आली परंतु घरात आई नव्हती .तिची आई बाहेर गेलेली असल्यामुळे तो एवढासा जीव हमसून हमसून रडत बसला . एकटीच रडत बसली आईची वाट पाहत . थोडया वेळात आई येताच तिने त्या एवढ्याशा जीवाला रडताना पाहून जवळ घेतले . आई त्या छोटयाशा जीवाला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांसमोर म्हणाली , " बेटा यापुढे खेळताना काही झालेच तर लागलीच डॉक्टर काकांकडे यायचे आणि ड्रेसिंग करून घ्यायचे . " त्यानंतर मात्र तिला खेळताना काही झालेच तर ती लागलीच डॉक्टर काकांकडे धाव घ्यायची . ती अकरा वर्षाची झाली आणि निसर्गाने आपली किमया दाखविली . ती आपल्याच मस्तीत , धुंदीत वावरत होती . अल्लड बालपण उपभोगत आनंदाने जगत होती . अशीच एके दि...
 मासिक पाळी                              मासिक पाळीचा पहिला अनुभव २८ मे हा प्रथमच 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस ' म्हणून साजरा करण्यात येत आहे . मी स्वतः या विषयावर गेल्या पाच सहा वर्षांपासून वैयक्तिकरित्या काम करीत आहे . माझ्या नात्यातील , परिवारातील ,मैत्रिणींना तसेच महिला मंडळे व भिशी ग्रुपमधील स्रियांना या विषयावर मी लिहिण्यास प्रवृत्त केले . नाशिक शहरातील काही शिक्षिकांनी मला जून महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात म्हणजेच शाळा सुरु होण्याच्या वेळेस अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वी मला इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थींनीसाठी स्पर्धा घेण्यास सुचविले त्यामुळे मला खूप आनंद झाला . एका स्रिचा मासिक पाळीचा दुःखद अनुभव ऐकल्यावर व मन्ना डे यांचे ' लागा चुनरी में दाग ' हे गाणे ऐकले तेव्हापासून आणि दासू वैद्य यांची ' जाळभाज ' ही कविता वाचली तेव्हापासून ' मासिक पाळी ' हा विषय माझ्या डोक्यात थैमान घालीत होता . पुरुष जर या विषयावर बोलू किंवा लिहू शकतात तर मग स्रियांनी का या विषयाला वर्ज्य करावे ? या विचारासरशी...
Image
हम हैं हिंदुस्थानी                               दि . २९ डिसेंबर २०१४ ला आम्ही बँकॉकला पोहचलो असता आमच्या टूर मँनेजरने आम्हांला तीन दिवसाचे नियोजन थोडक्यात सांगितले आणि grand howard हॉटेलमध्ये नेऊन सोडले . हॉटेलची भव्यता प्रथमदर्शनीच नजरेत भरली आणि तेथील प्रत्येक गोष्टीने मन मोहून घेतले . आमची रूम अठराव्या मजल्यावर होती . आम्ही आपापल्या रुमचे कार्ड घेतले आणि लिफ्टमध्ये कार्ड स्वाईप केल्याबरोबर आमच्या मजल्याचा अठरावा क्रमांक आला आणि बरोबर अठराव्या मजल्यावर लिफ्ट थांबली नि डोअर ओपन झाल्याबरोबर आम्ही लिफ्टमधून बाहेर पडलो . त्याच कार्डने आमच्या रूमचा दरवाजा उघडला . रूममधील आतली प्रत्येक वस्तू आकर्षक होती . बाथरूमविषयी तर विचारायलाच नको . पंचतारांकित हॉटेलमधील बाथरूम कितीही आकर्षक असले तरी बादलीतील पाण्याने आंघोळ करण्यातली जी काही मजा असते ती शॉवर व बाथटबने येत नाही काय करणार ! ' आदत से मजबूर ' असे म्हणण्याची वेळ येते . grand हॉवर्ड हॉटेल त्याच्या भव्यता , स्वच्छता व उत्कृष्ट वास्तुरचनेचा नमुना म्हणून जि...
मी आणि पुस्तके                  पुस्तकांसाठी मला नेहमीच झगडावे लागले आहे. अनेकवेळा मला हवे असलेले पुस्तक मिळत नाही तेव्हा मनाची होणारी घालमेल ही कुणाला सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही. ग्रंथपाल व्यक्तींना तर,"कुठून आली ही बया!"असेच वाटत असावे. अनेकवेळा हवे ते पुस्तक नाही मिळाले तर होणारी चिडचिड वेगळीच. अशाच काही पुस्तकांविषयीच्या मजेशीर आठवणी. आकाशवाणीवर 'माझे आभाळ तुला घे ' हे गीत चालू असताना अनेक गतस्मृतींना उजाळा देऊन गेले .या गीताने अनेक अडचणीतून दिलेली साहित्यभूषण परीक्षेची आठवण करून दिली .मी नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानची परीक्षा देण्याकरिता नाव नोंदणी केली .ही परीक्षा मे महिन्यात घरूनच उत्तरपत्रिका लिहून दयायची असते .परंतु परिक्षेच्या कालावधीत मला अचानक गोव्यातील साखळीम या गावी जावे लागले .मी गोव्याहून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयात फोन केला असता ,फोन लेखिका भावनाताई भार्गवे यांनी घेतला असता त्यांना मी माझी अडचण सांगितली .त्यांनी माझी अडचण जाणून मला साखळीमच्या पत्त्यावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिक...
सर्व रसिक वाचकांना ज्योत्स्नाचा नमस्कार. सर्वांनी माझ्या ब्लॉगला चांगल्याप्रकारे पसंती दिली त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद! अनेक वाचकांनी फोन करून व व्हॉटसएपवर प्रतिक्रिया देताना विचारले की आम्ही ब्लॉगवर कमेंटस पाठवली पण पोस्ट झालीच नाही. तरी सर्व रसिक वाचकांना मी विनंती करते की मीही आताच कुठे ब्लॉग लिहिण्यास सुरवात केली आहे त्यामुळे मलाही बरीचशी फंक्शनस अजून चांगल्याप्रकारे माहिती झाले नाहीत. आपण जर कमेंट बॉक्समध्ये 'कमेंट' लिहिली तर 'पब्लिश' या शब्दावर क्लिक केले तरच ती पोस्ट सेंड होते अन्यथा ती सेंड होत नाही. सर्व रसिक वाचकांनी मनमोकळेपणाने विचारले त्यामुळे खूप आनंद वाटला. तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वतःचे नाव व गावाचे व शहराचे नाव कमेंटच्या खाली अवश्य लिहावे कारण मी माझ्या पुस्तकात मला प्रोत्साहन देणाऱ्या वाचकांची नावे आवर्जून लिहित असते. माझ्या पूर्वीच प्रकाशित झालेल्या तीनही पुस्तकात मी वाचकांचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपण स्वतःचे नाव व गावाचे, शहराचे नाव अवश्य टाकावे. पुन्हा एकदा धन्यवाद!

बोच

बोच  कुणी दलितांचा कैवारी म्हणूनी   हिणविती मजला   कुणी घटनेचा शिल्पकार म्हणूनी   उदो उदो करती माझा   कुणी धर्मांतर करणारा म्हणूनी   दुर्लक्षंती मजला   कुणी भारतरत्न म्हणूनी   गौरविती मजला   कुणी बौद्धवादी म्हणूनी   झिडकारिती मजला   कुणी बुद्धिवंत म्हणूनी   ओळखती मजला   कुणी न म्हणती भारतीय मजला   ही खंत लागली जीवाला   कुणी न म्हणती माणूस मजला   ही बोच लागली जीवाला
पुस्तकांच्या जगात                               मनाची पकड घेणारी पुस्तके तशी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात नि असेच एक पुस्तक ' गेले लिहायचे राहून.' खरंच हे पुस्तक वाचताना जाणवते की अजून खूप काही लिहायचे राहूनच गेले आहे . लेखक विनायक पाटील यांच्या अनुभवांचा खजिना हा न संपणारा आहे याची जाणीव हे पुस्तक वाचताना हमखास होत असते . खरे तर हे पुस्तक फार पूर्वीच प्रकाशित व्हायला हवे होते परंतु उशिराने का होईना हे पुस्तक प्रकाशित झाले आणि समाजातील सर्वच घटकांसाठी ते किती उपयुक्त आहे याची जाणीव झाली . हे पुस्तक म्हणजे राजकीय क्षेत्रातील घडामोडींवर जसा प्रकाश टाकते तसेच ते कृषी क्षेत्रालाही समृद्ध करते नि सरकारी व शैक्षणिक कार्य प्रणालीवरही भाष्य करते व समाजाला उन्नतीचा मार्गही दाखवते . प्रत्येक घरी विनायक पाटील यांचे ' गेले लिहायचे राहून ' हे पुस्तक संग्रही असावे , असे हे पुस्तक वाचताना सारखे वाटत असते . या पुस्तकातील १०२ अनुभव हे लेखकाच्या प्रांजळपणाचे निदर्शक होय . संपूर्ण महाराष्ट्र विनायक ...
Image
मराठी अस्मिता                           पुण्याला अनेकवेळा येणे व्हायचे पण पुण्याला येऊन सिंहगड किल्ला पाहणे काही व्हायचे नाही . प्रत्येक वेळेला ठरवायचे की यावेळेस पुण्याला गेलो की सिंहगड किल्ला पाहायचाच पण हा ' च ' काही पाहण्याचा योग आणीत नव्हता त्यामुळे ' च ' जोडूनही उपयोग नव्हता . शेवटी मनात म्हटले , जाऊ दया . जेव्हा आपलं आणि सिंहगडाचं गोत्र जुळून येईल त्यादिवशी भेटीचा योग येणारच आणि खरोखरच एके दिवशी ध्यानीमनी नसताना माझी लेक म्हणाली , " आज रविवार आहे आपण सर्वजण सिंहगडावर जाऊ या , गड चढताना सगळ्यांचीच दमछाक होत होती तर काही तरूण मुले भराभर गड चढून जात होती . काही मुले मात्र चार - पाच मुलींना पाहून रेंगाळत आणि शेरेबाजी करीत गड चढत होती तेव्हा त्या मुलींसोबत आम्हांला हळूहळू गड चढणे भाग पडले . त्या मुली आम्हांला म्हणाल्या , " काका , काकू , तुम्ही आमच्यासोबतच राहा ." आम्ही त्यांची विचारपूस केली असता कळले की , त्या पाची मुली बहिणी होत्या . आम्ही पाच बहिणी असे म्हणताच , त्या एका सुरात म्हणाल्या , आम्...