Posts

Showing posts from November, 2019

माझ्या भ्रमंतीवरील ताशेरे

माझ्या भ्रमंतीवरील ताशेरे मैत्रिणींचे फोन आलेत की सगळ्यांचे उद्गार असतात,"कालच तर तू नाशिकला होतीस नि आज वर्ध्याला पोहचली पण." पुन्हा पंधरा दिवसांनी मैत्रिणींचे फोन आलेत की, त्या हसतच म्हणतात, "वर्ध्यालाच आहेस की झाली पसार." मग मी म्हणते, " पसार व्हायला मी काय दरोडेखोर वाटली का तुम्हांला!" मैत्रिणी हसतच म्हणतात, "तुझा काही भरवसा नाही. एखादी लायब्ररी लुटली नाही म्हणजे झालं." मग त्यांना सांगावं लागतं आता मी लायब्ररीतून पुस्तके आणणेच बंद केले. वाटते तेव्हा पुस्तक विकत घेऊन वाचते त्यामुळे लायब्ररी सुरक्षित आहे. काळजी नका करू." मग मी हळूच सांगते कालच वर्ध्याहून पुण्याला आली." आता मी पुण्याला असल्याची बातमी सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोहचलेली असते नि मग पुन्हा चार-पाच दिवसांनी दुसऱ्या मैत्रिणीचा फोन येतो तर मी तेव्हा नेमकी साक्री किंवा धुळ्याला असते नि मग ती मैत्रीण सर्व मैत्रिणींना लाईव्ह टेलिकास्ट देऊन मोकळी होते मग त्यातल्या दोघी-तिघींचे फोन येतात, " आम्हांला माहीत नाही यावेळेस तू ट्रीपला आलंच पाहिजे."         दुसरी मैत्र...

परीक्षार्थी

Image
                      परीक्षार्थी            नाशिकहून पुण्याची घरगुती भटकंती नि त्या भटकंतीतील परीक्षा घेणारा व पाहणारा दिवस.              एखादा दिवस आपली परीक्षा पाहणारा व आपल्यातलं सगळं धैर्य व सहनशीलतेचा कस पाहणारा ठरतो. असाच आजचा दिवस १९ नोव्हेंबर २०१९चा! १३ नोव्हेंबरला मुलगा एक महिन्यासाठी यूकेला गेला नि इकडे पुण्याला सूनेचा आठ दिवसांनी एका कंपनीत इंटरव्ह्यू असल्यामुळे मला पुण्यालाच थांबावे लागले. मी पुण्याला आली म्हणून सासूबाईंना पुतण्याकडे ठेवले. मी पुण्यात आल्यावर दोन दिवसांतच सासूबाई पडल्यात नि त्यांना कंबरदुखीचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी एक्स-रे, गोळ्या औषधे दिलीत पण काल त्यांच्या बोलण्यावरून जाणवले की त्यांना त्रास होत आहे आणि माझी कमी जाणवते आहे. पती महाशयांनाही आठ दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनने बेजार केले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था. त्यातच मला अपरिचित असणाऱ्या व्यक्तीने पुरस्कार घेण्यासाठी आमंत्रित केलेले अर्थात त्यांना मी कळविले...

रसिकांशी हितगूज

रसिकांशी हितगूज         नमस्कार रसिक वाचक, 'माझी भटकंती' हा ब्लॉग भटकंती विषयक अनुभवांवर तर आहेच पण त्याचबरोबर समाजातील व निसर्गातील इतर घटकांविषयी ही भटकंती घडवून आणणारा आहे. यात कौटुंबिक नातेसंबंधातील भटकंती आहे, सामाजिक विषयांची भटकंती आहे तशीच नैसर्गिक भटकंतीही घडवणारी आहे. वाचकांना ज्या विषयात रूची आहे त्यानुसार ते ब्लॉगवरील लेखन वाचू शकतात.            जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मराठी बांधवांना माय मराठीची भेट घडवून आणणे नि त्यांची नाळ मराठी मातीशी घट्ट राहावी याच उद्देशाने मला ब्लॉग लिहण्यास प्रेरणा मिळत असते. मराठी भाषेतून ब्लॉग लिहणाऱ्यांची संख्या कमी आहे नि त्यातही ब्लॉगविषयी तांत्रिक अडचणी सांगणारी अनुभवी व्यक्ती नसल्यामुळे स्वतःच शिकत नि मुलगी व सूनेचं डोकं खाऊन चाचपडत चालणारी माझी ही वाट आपल्यासारख्या रसिक वाचकांमुळे सुखावह होत आहे याचा आनंद वाटतो. धन्यवाद रसिक वाचकांनो! ब्लॉगर, ज्योत्स्ना पाटील

साहित्य आणि कला

नमस्कार रसिक वाचक, ब्लॉगची सेटींग्ज चेंज झाल्यामुळे अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया सेंड होत नाहीत पण आपण व्हाट्सएपवर प्रतिक्रिया पाठवून कळविले त्याबद्दल मनापासून धन्यवाद!  आता प्रतिक्रिया देताना तुमचा ई-मेल आयडी, पासवर्ड टाकल्यावर म्हणजेच लॉग इन केल्यावरच प्रतिक्रिया पोस्ट होत असते. तसदीबद्दल क्षमस्व. साहित्य आणि कलेतून मी काय मिळविते?                २००४ साली 'प्रतिबिंब मासिकाने एक लेखस्पर्धा आयोजीत केली होती. स्पर्धेचा विषय होता 'साहित्य आणि कलेतून मी काय मिळवतो?' मला स्पर्धेतला 'मिळवतो' हा शब्दच खटकला की अरे मिळवतो म्हणजे या स्पर्धेत स्रियांनी भाग घ्यायचा की नाही. पुल्लिंगी क्रियापद कदाचित स्पर्धा घेणाऱ्यांच्या लक्षात आले नसावे! असो, ही स्पर्धा नक्कीच स्त्री-पुरूष दोघांसाठी असावी असा विचार करून लेख लिहिला नि दिला पुण्याच्या पत्त्यावर पाठवून. स्पर्धेसाठी लिहिलेला लेख पोस्टाने पाठवून दिला नि त्यानंतर मी विसरूनही गेले नि जवळजवळ पाच-सहा महिन्यांनी एक मासिक माझ्या पत्त्यावर आले नि बघते तर काय? माझ्या लेखाला द्वितीय पारितोषिक मिळाले ...

रूटस्

                     रूटस्           जीवनाची पाळंमुळं किती खोलवर रूजलेली असतात याचे प्रत्यंतर मला बालमैत्रीण निलिमा हिने पाठविलेल्या व्हीडिओज् पाहताना प्रकर्षाने जाणवले.       लंडनजवळ ग्लॉस्टर शहरात राहणाऱ्या मैत्रिणीने दिवाळीच्या पार्टीचे फोटोज्, व्हिडीओज् पाठवलेत नि खूप आनंद झाला. माझी बालमैत्रीण निलीमा जोशी कुलकर्णी मागच्याच महिन्यात भारतात येऊन गेली तेव्हा आम्ही मनसोक्त गप्पागोष्टी केल्यात आणि दिवाळीला भारतात येणे शक्य नसले तरी तेथील सर्व भारतीयांनी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले. त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडीओ पाहताना मन अभिमानाने भरून आले. माणूस कुठे का जाईना पण तो आपल्या मातीला, आपल्या संस्कृतीला विसरूच शकत नाही. मला निलिमाच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ पाहताना अचानकपणे चौदा-पंधरा वर्षांपूर्वी वाचलेली 'रूट्स' ही कथा आठवली. बहुतेक ती कथा मोनिका गजेंद्रगडकर यांची असावी. ©ज्योत्स्ना पाटील.

रसिक वाचक

नमस्कार रसिक वाचक, आता माझा ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांमध्ये इंडोनेशिया, फिलिपीन्स येथील वाचकांचीही भर पडली याचा विशेष आनंद होत आहे. मराठी भाषेशी माझ्या महाराष्ट्रीयन बांधवांची नाळ किती घट्ट जोडली गेली आहे, याचा अभिमान वाटतो. मराठी भाषेत ब्लॉग लिहून माय मराठीची सेवा करण्यात खारीचा वाटा उचलता आला नि माझ्या लिहण्याचे सार्थक झाले. असो, सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद नि जाता जाता महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर एक चारोळी, पक्षाला बहुमत नसता सारे बांधावर धावले हातात जुडी असता सारे कास्तकार झाले ©ज्योत्स्ना पाटील.

कौटुंबिक आठवणी

कौटुंबिक आठवणी मागील वर्षाच्या दिवाळीच्या आठवणी खैरनार पाटील परिवार कधीच विसरू शकत नाहीत. मागच्या वर्षी दिवाळी साजरी करताना कुणालाच वाटले नव्हते की, आमच्या कुटुंबातील एक सदस्य या वर्षाच्या दिवाळीत नसणार. काळाची चक्र केव्हा, कशी फिरतील ते कधीच कुणी सांगू शकत नाही. आम्ही सर्वजण दिवाळीत धमाल करीत असताना आमचे रावसाहेब सोफ्यावर बसून शांतपणे सर्वांचे निरीक्षण करीत बसले होते. त्यांना तसे बसलेले पाहून वाटते की त्यावेळी त्यांच्या मनात कोणते विचार चालले असतील. त्यांना वाटत होते का की, मी हे क्षण पुन्हा अनुभवू शकेल की नाही! कसल्या विचारात ते गुंतले होते. त्यांचे तसे शांत राहणे सर्वांनाच त्यावेळी जाणवले होते. आमच्या महाशयांनी दोन-तीनदा विचारले देखील, "रावसाहेब, कसला विचार करीत आहेस?" त्यांनी "काही नाही." एवढेच त्रोटक उत्तर दिले आणि आता वाटते, त्यांच्या मनात काय चालले होते त्यावेळेला? हा प्रश्न आजही मनात येतो नि मन कासावीस करीत असतो. माणसाचं जगणं इतकं क्षणभंगुर असू शकते, या विचारापाशी येऊन मनाला आवरणे कठीण होत असते. हा व्हिडीओ शूट करण्याची मला सुचले कसे याचेही मला आश्चर्य वाट...