Posts

Showing posts from September, 2019

तेरे घर के सामने, एक घर बनाऊँगी.....

Image
   चला, आज थोडी वेगळ्या वाटेने म्हणजेच निसर्गासोबत तेही घरातल्याच निसर्गासवे भटकंती करून येऊ या!         तेरे घर के सामने, एक घर बनाऊँगी.....!              पुणे व बारामती येथे १९ ऑगस्ट २०११ ला गेलो होतो. दोन दिवसांनी म्हणजेच २१ ऑगस्ट २०११ ला सायंकाळी साडे सात वाजता घरी पोहचलो. घरी येताच सर्वांना चहा करण्याकरिता मी किचनमध्ये येताच किचनच्या खिडकीसमोर खूप मोठा काळ्या आकाराचा डोंगरच चिकटलेला दिसला. त्या डोंगराला पाहताच प्रथम मी घाबरलेच. अरे बाप रे! हे काय लागले आहे आपल्या घराला असे वाटून जास्तच घाबरले नि आमच्या महाशयांना जोरात आवाज दिला, "पाटील साहेब इकडे या. हे बघा काय आहे येथे!" असे म्हणत मी बारकाईने पाहिले तर मधमाश्यांनी पोळं बनविण्यास सुरवात केली होती. हजारो मधमाश्यांना एकाच जागी आणि तेही इतक्या जवळून पाहून मला खूपच आश्चर्य वाटले. दोनच दिवसांत हजारो मधमाश्या कुठून आणि कशा आल्यात? या प्रश्नाने डोक्यात चांगलेच थैमान घातले होते. छताला चिकटलेल्या या मधमाश्यांनी उलटा डोंगरच माझ्या डोळ्यांपुढे तयार करून ठेवला आणि जणुका...
सर्व रसिक वाचकांना नमस्कार. साहित्यिक कामाच्या व इतर कामांच्या गडबडीत बऱ्याच दिवसांपासून लेख पोस्ट करू शकले नाही त्याबद्दल नियमितपणे ब्लॉग वाचणाऱ्या रसिकांची माफी मागते. आजपासून आठवड्यातून एक लेख पोस्ट करण्याचा प्रयत्न करून वाचकांना वाचनानंद देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद! लेखिका, ज्योत्स्ना पाटील.

​​ऐतिहासिक वास्तू - अग्वाद किल्ला

देश-विदेशातील सर्व रसिक वाचकांना, ज्योत्स्नाचा नमस्कार. बऱ्याच दिवसांपासून पोस्ट टाकली नाही म्हणून काही वाचकांनी फोन करून तर काही वाचकांनी मेसेज करून विचारणा केली तेव्हा खूप आनंद झाला कारण वाचन-संस्कृती टिकून आहे. असो,  चला तर मग आज अशाच एका किल्ल्याची सैर करू या. ज्यांनी या किल्ल्याला भेट दिली असेल त्यांनी आपल्या स्मृतींना उजाळा देऊन आनंद घ्यावा नि ज्यांनी या किल्ल्याला भेट दिली नसेल त्यांनी कल्पनेनेच तेथे जाऊन सैर करण्याचा आनंद लुटावा हाच हा लेख लिहिण्यामागचा हेतू। चला, तर मग एक फेरफटका गोव्याला मारून येऊ या                                           ​​ ऐतिहासिक वास्तू - अग्वाद किल्ला                गोवा म्हणताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो समृध्द निसर्ग आणि तेही समुद्राची गाज घेऊनच. समुद्राने गोव्याला फक्त बीचच दिले असे नव्हे तर तेथील लोकांना व्यवसाय आणि भरभरून अर्थसंपत्तीही बहाल केली आहे. गोव्याचे अर्थकारण नेहमीच भरभ...